Tuesday, September 27, 2011

जीवनाच्या वाटेवर आपण एकमेकांचा हात धरला होता

जीवनाच्या वाटेवर आपण एकमेकांचा हात धरला होता
पण का कोणास ठाउक तो नंतर सैल होत गेला
यशाच्या मागे तुला धावायचं होत
पण मला मात्र संसारात रमायचं होत
तरीही तुझ्यासोबत पळण्याचा मी खूप प्रयत्न केला
... अशीच दम छाक होऊन मग तुझा हात माझ्या हातातून निसटत गेला
मी मागे मग कुठेतरी तुझी सावली बनून राहिले
पण यशाच्या ओघात तू या सावलीलाही सोडून दिले
आज तू दूर कुठेतरी हरवला आहेस,आपण एकाच वाटेवर असूनही
अजूनही कोरडीच कशी रे मी , पाउस सोबतीला असूनही?

No comments:

Post a Comment