Thursday, September 29, 2011

न मागताच तू खूप काही दिलेस

न मागताच तू खूप काही दिलेस ..........

पहाटेच्या गुलाबी थंडीत आठवणींची ऊबदार रजई दिलीस
चांदण्यांच्या शीतल प्रकाशात उजळणारी स्वप्नांची रात्र दिलीस

एका क्षणातच जणू आयुष्य जगण्याचा हर्ष दिलास
दुःखी निराश मनाला मायेचा हळूवार स्पर्श दिलास

आकांक्षांचे ढासळलेले मनोरे पुन्हा एकदा उभे केलेस
हरवलेले सूर छेडूनी अंतरी प्रीतीचे गीत फुलविलेस

आयुष्यात ज्याची कमी होती ते सारे काही पदरात टाकलेस
एका कोमेजलेल्या कळीला जणू पुन्हा नवजीवन दिलेस

काही उरलेच नाही आता मागण्यासारखे ...

खरंच ... न मागताच तू खूप काही दिलेस !!!

संदर्भ

संदर्भ...काही जुळलेले...
काही उधळलेले...
रिते झालेले प्राक्तनाचे घडे...
मी मागेच सोडुन टाकलेत..
एक एक करत..सगळेच...संदर्भ.
मी कधीचेच पुसुन टाकलेत
सरला तो कालचा दिवस
त्याची चिंता आज का करायची...
उगाच...चिमटीत धरुन दिव्याची वात
स्वतः का विझवायची?
काही भावना...अव्यक्तच राहुदेत...
काही शब्द...मुकेच राहुदेत
तरच त्यांना अर्थ सापडतो
त्यासाठी काही संदर्भ रिक्तच राहुदे
समीकरण....तशीच राहुदे..
काही प्रश्न....असेच राहुदे...
काही प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील...
प्रत्येक रेषा हातावरच्या....
एकमेकांशी जुळतील
सारं काही घडुन गेलं..
ते पानही फाटुन गेलं
आता सारं काही मीच बदलणार...
हातावरच्या रेषांच गणीत,
आता मीच चुकवणार..


ओंकार

source: http://thepowerofthedreamz.blogspot.com

अर्थ

माझ्या -हुदयाच्या...प्रत्येक स्पंदनावर...
सखे आता तुझंच नाव असेल...
अन...माझ्या प्रत्येक कवितेत...शोध...
निदान एकदातरी तुझे नाव दिसेल..

पुन्हा त्या सरोवराच्या ...पाण्यात
वारंवार तुझं...प्रतिबिंब दिसेल...
एक बट मुद्दाम सोड सये...गालांवर..
नाहीतर...तो नभीचा चंद्रमा ..लाजेल

सावर...सखी आवर मला..
आज बहुदा -हुदयाचा एखादा ठोका चुकेल...
बघ..शोधशील कदाचित खुळ्यासारखी मला...
जेंव्हा..माझ्या कवितांचा अर्थ वेडे तुला कळेल

ओंकार
source: http://thepowerofthedreamz.blogspot.com

आठवणी...कोमेजलेल्या

जुन्या..नव्याच्या वादांत...
आठवणी मात्र कोमेजुन गेलेल्या..
अन...मग पुन्हा एकदा वाद..
कोणाचे चुकले...अन काय?..
सा-या वाटा मागे फिरण्याच्या..
क्षितीजापार हरवुन गेलेल्या
काही कटु आठवणी...
शब्दांत गुंफुन कित्तेकदा मी
सर्वांत वेगळा राहीलेला...
अन मग हसरा मुखवटा लावुन
चेह-यावर मी कायम हसत राहीलेला.
तु..चिंब होऊन भिजलीस..
तेंव्हा तुझ्या बटा सावरणारे
हात माझेच होते..
तु सोडुन गेलीस वाट अचानक..
तेंव्हा..आभाळातुन...अनिर्बंध
बरसलेले डोळे माझेच होते
ओंजळीतुन वाळु अलगद निसटावी..
तसे शब्द शब्द...रिते होणारे...
अन ...नंतर मीच सांडलेला..
नि:शब्द होऊन...शब्दांशिवाय...
घडुन गेलेला इतिहास...
तसाच उगळुन उगळुन संपुन गेलेला..
अन मी..
तुझ्या आठवांवर कविता लिहीताना..
असाच सहजच विस्मरणात गेलेला
अगदी कोणाच्याही नकळतचं.....

ओंकार

source: http://thepowerofthedreamz.blogspot.com

बोलता बोलता...

आरशात स्वतःचाच चेहरा आताशा,
अनोळखी वाटु लागलाय
का जगतोय आणी कोणासाठी,
आता हा प्रश्न पडतोय..
तिच्यासाठी वा तिच्या वेड्या आठवांसाठी...
काहीच कळत नाही
जगण्याचे ध्येय माझ्या,
काही केल्या सापडत नाही
भासांच्या ह्या भोव-यात
खोल खोल गुरफटलोय
ह्या अगतीकतेचा अंत
का गवसत नाही?
अथांग सागराला मनाच्या
सोशीक किनारा सापडत नाही?
आता कळतेय की
क्षितीज कितीतरी दुर होते..
मृगजळाच्या मागे धावत होतो नुसता....
दिशाहीन....ध्येयहीन
काहीच नव्हते
कोणीच नव्हते...
साथ दयायला 
मला समजवायला
बस ह्या जगात जगत होतो निमुटपणे
काटेरी पाऊलवाटा
पायाखाली तुडवत होतो
भळभळती जखम मात्र लपवत होतो
जगापासुन ....
तुझ्यापासुन...
तुझ्या पायाखाली मखमल पसरली
मी मात्र तसाच
जळत्या निखा-यांवरुन चालत
पोळलेले पाय लपवत
चेह-यावर खोट्टं स्मित 
सारं नाटकी........
आता खुप दमलोय....खुप थकलोय...
आता काहीच सुचत नाही 
इतके दिवस ज्याचासाठी धावलो
ते केवळ दिवास्वप्न ठरले
निवांतपणाचे चार क्षण शोधत होतो
आता डोळ्यात खुपतायतं
त्या तुझ्या आठवणी...
अन् तु आणी मी
एकत्र घालवलेले ते भावक्षण
त्या एकत्र जगण्याचा आणाभाका
कापरासारख्या उडुन गेलेल्या...
तुझ्या आठवणींत घुसमटलेला मी
अगतीक असहाय्य
सारे काही अगदी होते तसेच
पुर्वीसारखे
सारे काही जिथल्या तिथेच...
घड्याळाचे काटे कोणीतरी
धरुन ठेवावेत....
आताशा श्वासही गुदमरतो
तुझा विचार करु लागलो की
वाटते संपवुन टाकवे स्वतःला
ह्याक्षणी
ह्या त्रासातुन मुक्त व्हावे कायमचे
अगदी कोणाच्याही नकळत
अनं स्वत:च्याही....
मिटुन जावे
पुन्हा कधीही न उमलण्यासठी...
पण....
पण.... पण कोणासाठी मरायचे?
कोण तू? कुठली तू?
काय दिलेस मला तू आजवर
नात्याच्या नावाखाली डोळ्यात पाणी
ओठांच्या आड दडवलेला
तो हुंदका बस्स....
का रडू तुझ्यासाठी?
आणखी काही तू देउच शकली नसतीस मला....
तुला ते जमलेच नसते कधीच
देण्याचा अर्थ तुला कळलाच नाही कधी
ते समाधान तुला उमजणारच नाही कधी....


:-
अबोली आणी ओंकार
source: http://thepowerofthedreamz.blogspot.com

या राजे तुम्ही खरंच परत या

राजे तुमच्या राज्यात
सगळ्याचा नुसता बट्याबोळ झालाय...
तुमच्या चरणाने पवीत्र झालेल्या भुमीत
नुसता भ्रष्ठाचाराचा पुर आलाय,
"कॉमनवेल्थ" नावाचा
एक भलताच वायरस भारतात आला...
"कॉमन"मँनची "वेल्थ" लुटण्याचा 
सरकारी परवानाच जणु लांडग्यांना मिळाला...
रोज वाहातात आज इथे रक्ताचे पुर...
राजे हे सारं पाहुन तुमचाही भरुन येईल ऊर....
काळाची गरज आहे घडी स्वराज्याची बसवुया,,,
या राजे तुम्ही परत या,,,

मराठ्यांच्या नशीबी अजुनही
दुहीचीच मेख आहे,,,
फे-यात अडकुन गटा-तटांच्या
मराठी मुलुख तिष्ठत आहे...
आपण जगवला... 
शंभुराज्यांनी वाढवला...
तो महाराष्ठ्रधर्म आज पुन्हा जगवुया.... वाढवुया....

या राजे तुम्ही पुन्हा परत या....

रघुकुलोत्पन्न आपण हे इथले काही लोक विसरले...
श्रीरामाचे अस्तित्व नाकारत चक्क कोर्टातही काही गेले
आज प्रभु रामचंद्रांचे अस्तित्व कोर्टानेही मान्य केले...
त्यांस रघुकुलाची श्रेष्ठ तत्वे शिकवुया...

या राजे तुम्ही परत या....

मेघडंबरी सुनी राहुन कंटाळलीय....
दुर्गराज आज पाहतोय वाट...
तख्थ पुन्हा एकदा मांडण्याची,,,
नगारखाना.... तोफा गर्जतील जोमाने
सांगताना विरगाथा मराठ्यांची....

ह्या मराठेशाहीसाठी सांडले रक्त अनेकांनी 
त्या ज्ञात अज्ञात विरांना आठवुया 

या राजे तुम्ही खरंच परत या......


ओंकार
source: http://thepowerofthedreamz.blogspot.com

तु लाजतेस.. बावरतेस..

तु लाजतेस.. बावरतेस..
गालावरची खळी...बहुरन जाते..
बट ओघळती गालवरची सावरतेस अलगद 
नी काळी जादु डोळ्यांनी करुन जातेस

तुझ्यापासुन दुर जाण्याचा प्रश्नच कुठे आला..
आजवर सावलीला दुर कोणी करु शकलाय का?
श्वास आहेस माझ्या शरीरातला
त्याला दुर लोटुन कोणी जगु शकलाय का?

तुझी साथ मिळाली तर 
सा-या जगाविरुध्द लढेन मी..
तुझ्या ओंजळीत चांदण्यांची
सारी दौलत लुटवेन मी

तो हात नेहमीचा ओळखीचा..
कायम राहील ना ?
दुःख आहे आयुष्यात माझ्या
तरीही तु साथ देशील ना?

ठाऊक होते.की तु मुददाम नाटक करतेयस..
पण कुठेतरी मनात तुही मलाच शोधतेयस...
आपलं नातं आहेच असे...
दुर असुनही जवळ आणणारं

मी असेनच सोबत तुझ्या 
भांगातलं सौभाग्यलेणं बनुन..
हात हलताच गुंजणारा
तो हातातील चुडा बनुन

शरीर माझं
आत्मा तु,,
धडाडणारं -हुदय माझे..
अन श्वास सखे तु..

ओंकार

मग क्षणात फुल ते.. लागले सुंदर हसू

चाललो होतो असाच एकदा
पाठून दिला कुणीतरी आवाज
दादा एक रुपया तरी दे आज............

मागे वळून पाहता
... पसरले होते हात चिमुकले
कोमेजलेला चेहरा आणिक
डोळ्यातील पाणी सुकलेले ..................

चेहऱ्यावरील भाव बोलती
काहीतरी दे
याचना करतो तुजपाशी
माझ्या सकट आज माझी
भावंडे आहेत उपाशी.................

बापास दारूचा संग
त्यास आठवते ना घरदार
आई अंथरुणाला खिळलेली
पडली आहे कायमची बिमार.............

असा मोडलेला घराचा कणा
घरी नसे एकही दाणा
सगेसोयरे करतात हडहड
असह्य होते भुकेसाठी धडपड..................

सांगायलाही नाही वेळ
ही करुण कहाणी
डोळे ही थकले आता
गाळून सारखे पाणी.................

पाहून नयनांत त्या
पीळवटले माझे आतडे
सहज हात गेला खिशाकडे
काढून दिले थोडे रोकडे..................

मग क्षणात फुल ते
लागले सुंदर हसू
पाहून निरागस हास्य ते
नयनांत माझ्या चमकले
अलगद दोन आसू.................

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव………….
प्रेमासाठि जगाव………..
प्रेमाखातर मराव…………….

त्याच्या एका हास्यावरती
अवघं विश्व हरावं
अन अश्रुच्या थेंबालाहि
डोळ्यात स्वत:च्या घ्यावं….

दुखाची भागी होऊन ….
सुख त्याच्यावर उधळाव………………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

तु आणि मी हे व्याकरण
प्रेमात कधीच नसावं………….
आपलेपणाच्या भावनेतच
सार मी पण सराव…..

एकमेकांच होऊन
एकमेकांना जपाव………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

मधुर त्याच्या आठवणीमध्ये
रात्र - रात्र जागावं……….
अन चुकून मिटताच पापण्या
स्वप्नात तयाने यावं..

बहरल्या रात्रीत चांदण्या
त्याच्या विरहात झुराव…….
पण खरच……………..

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं……….
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

ती

ती खळखळून हसते आणि मला आनंद होतो,
ती हलकेच लाजते आणि मी लालबुंद होतो,
ती कधी अबोल होते ,
मी मात्र तिच्या एका-एका शब्दाची वाट पाहतो.
ती माझ्यासोबत असते,
आणि मी हे विश्वच विसरून जातो.
अन ती नसताना ती असल्याचा भास होतो,
नयन शोधतात तिला अन मन व्याकुळ होत.

असं का होत?

असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......

असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....

असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......

असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो.......

असं का होत? कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो.....
अनं तो आनंदच सगळ्या दुःखानंच मुळ होऊन जातो....

असं का होत? कुणासाठीतरी जगावास वाटतं......
अनं जगावास वाटतानाच, मरणाला कवटाळाव लागत

Wednesday, September 28, 2011

या जगात सगळच , बाहेरून सुंदर दिसत.....

या जगात सगळच , बाहेरून
सुंदर दिसत.....
प्रत्यक्षात मात्र
गुणी ,फारच थोड असत....
सुंदर आणि गुणी अस , जगात
एकच असत....
ते म्हणजे सुंदर , गुलाबाच फुल
असत....
काट्यावर उभ राहूनही, सतत
सारख हसत असत....
दुसर्याच्या आनंदासाठी , खुप
खुप फुलत असत....
निस्वार्थी निरागस अस ,
मोहक त्याच रूप असत....
'प्रेम ' व्यक्त करताना ,
म्हणुनच ते प्रतिक असत....
सर्वांमध्ये त्याला , राजाच
स्थान असत....
म्हणुनच डौलात ते ,
वार्यावरती डोलत असत....
जितक सुंदर जितक मोहक ,
तितकच ते खट्याळ असत....
काट्याशिवाय हाताला ,
सहज अस लाभत नसत....
देवाच्या देव्हारयात
त्याला , मानाच स्थान
असत....
आपल्याजवळ असत तेंव्हा ,
आपला ते मान राखत....
एक दिवसाच्या आयुष्यात ,
खुप काही शिकवून जात....
स्वत: काहीच न घेता , खुप
काही देउन जात!!!! :)

ऐक क्वार्टर कमी पडते

ऐक क्वार्टर कमी पडते :P
दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही
सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते ::)
पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते
मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्या पेक्षा मोठा असतो
स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते :o
पीण्याचा कार्यक्रम पीणार्याऐला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा
क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दारु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते >:(
पीणार्या मध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते ;D
चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी
त्यालाच यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते :-[
फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते... 8)
यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते
याच्यामुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते... :

साले हे मित्र असतात बाकी मस्त !!!!!!!!!!!!!

साले हे मित्र असतात बाकी मस्त !!!!!!!!!!!!!

"काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?"

"तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!"
...
हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं.

पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

"नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं!

पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं!

निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं!

पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त!

तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं!

पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं!

उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं!

पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं!

Break-up नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,

पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं,

तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी,

दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं!

पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,

खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा!!!

आज अचानक दैव कसं माझ्यावर बलवत्तर झालं

सकाळी बसमध्ये झालेल्या नाट्यमय अपघातावर सहज केलेलं मनोगत, आशा आहे तुम्हालाही ते आवडेलं.....:D

"आज अचानक दैव कसं माझ्यावर बलवत्तर झालं,
बसमध्ये चढल्या सुंदरीशी थोडक्यात भेटवून गेलं!!

गर्दीमधून वाट काढत निघाली जसा जवळ आला Stop ,
बट सारत मुखड्यावरची सळसळत नागीण Non - Stop !!

नजर पडली अवचित...नजरानजर झाली, झाला गोड अपघात,
माझ्या Bag च्या चेनला अडकून ओढणीने तिच्या केला घात!!

ताणली जशी ओढणी वळून बघितलं......आहा....नजाकत,
धरून हातात भरजरी ओढणी दिली खल्लास Smile लाजत!!

व्यर्थ गेला सोडविण्याचा तिचा मिनिट भराचा खटाटोप,
सर्वांच्या मिश्कील नजरेतून होत होते Dramatic आरोप!!

हसती तिची नजर मात्र खिळली होती माझ्यावरचं जराशी,
जेव्हा तिची मैत्रीण खेळायला लागली चेन आणि ओढणीशी!!

शेवटी न राहवून मीचं केला प्रयत्न सोडविण्याचा तो गुंता,
मलाही जमेना शेवटी तिच्या मधुर आवाजानेचं भंगली शांतता!!

Plz ....तोडा आता ते धागे मला कॉलेजला खूपचं झालंय लेट,
चेहऱ्यावरचे अगतिक भाव पाहून तिच्या मीही मग तोडले थेट!!

हसत गेली पुढे निघून मिळाला उतरतानाचा एक ओझरता कटाक्ष,
आधीचं सुखावलेल्या चातक मनावर Sollid मोरपिसं फिरली लक्ष!!

खटकन तुटले सखे ते खट्याळ धागे तुझ्या भरजरी ओढणीचे,
पण भास आभासात नकळत कुठेतरी जुळले धागे दोन मनांचे!!

सांग सालस हरिणी परत अशीचं मुद्दामहून कधी भेटशील का??
Bag ला नाही आता माझ्या अधीर दिलालाचं अडकशील का??

तू म्हणजे....

तू म्हणजे....

तू म्हणजे अशी नशा
ग्लास इतका फ़ुल्ल भरलेला,
की ग्लास सुद्धा होई शराब !!!
तू म्हणजे अशी हट्टी की ;
आधीच घाट रस्ता
आणि त्यात पुन्हा गाडी खराब !!!

तू म्हणजे वैशाख वणव्यात
वळवाचा पाऊस !!
तू म्हणजे कुडकुडत्या थंडीत
आईस्क्रीम खायची हौस !!!

तू म्हणजे काळे ढग
आणि नाचणारा मोर
तू म्हणजे हळूच चिमटा
काढणारं खोडकर पोर

तू म्हणजे अस्सं प्रेम आईचं तान्ह्यावरती
तू म्हणजे असा राग बापाचा पोरावरती

तू म्हणजे वाफ़ाळलेली कॉफ़ी
आणि हवासुध्दा अशी धुंद
तू म्हणजे पावसची पहिली सर,
आणि सुटलेला मातीचा गंध...

कधी कधी तू इतकी शांत इतकी गप्प...
जसा माझ्या मनानं माझ्याशीच पुकारलेला बंद
आणि आपले सगळेच वाद / संवाद ठप्प !!!

कधी तू अशी कि जशी शांत, निवांत वेळ
आणि माझा माझ्याच सावल्यांशी चाललेला खेळ !!!

Tuesday, September 27, 2011

आज समजते आहे तुझे माझ्या आयुष्यात येण्याचे महत्व. . .

आज समजते आहे तुझे माझ्या आयुष्यात येण्याचे महत्व. . .
देवाने का माझी अन तुझी भेट घडवली ते. . .

त्या दुःखाच्या चक्रव्युहात अडकलो होतो मी. . .
त्यातून बाहेर काढलेस तू मला,
... आपले मानलेस. . .
तुझे प्रेम दिलेस. . .
जीवन जगायला शिकवलेस. . .
थकून गेलेल्या मनाला
ऊभारी दिलीस. . .
लढायला शिकवलेस मला. . .

जीवनात सतत झिडकारलो गेलो होतो मी. . .
सतत हरत आलो होतो मी. . .
अशा माणसांचे तर नशिबसुध्दा साथ सोडते,
पण. . .
पण तु साथ सोडली नाहिस माझी. . .
माझ्या नशिबाशी लढलीस. . .
केवळ आणि केवळ
माझ्या सुखासाठीच. . .

आयुष्यात नेहमी दुःखच मिळाले होते गं,
त्यामुळे हसणेच विसरून गेलो होतो. . .
निस्तेज झालेल्या
डोळ्यात अश्रु आणि अधु~या राहीलेल्या
स्वप्नांशिवाय काहीच नव्हते राहीले. . .
पण. . .
पण तू त्या डोळ्यांना
नवसंजीवनी दिलीस,
पून्हा नवं स्वप्न पाहायला
शिकवलंस मला,
सर्वांनी पाहून पण
न पाहिल्यासारखे
केलेल्या त्या
माझ्या अश्रुंना मोत्यासमान महत्व दिलेस तू. . .

गर्दित राहूनही अलिप्त
राहत होतो मी,
सर्वांनीच सोबत नाकारल्यामुळे
एकटा पडलो होतो,
स्वतःचे अस्तित्वच विसरून गेलो होतो मी. . .
पण. . .
मला माझीच ओळख करुन दिलीस तू. . .
सुखात तर सर्वच जण साथ देतात गं पण दुःखात साथ देणारी तू एकमेव आहेस. . .


किती केलेस गं माझ्यासाठी. . . ?
माझ्या सुखासाठी
माझ्या त्या एका एका
अश्रुच्या थेंबासाठी
आपले सर्वस्व पणाला लावलेस. . .
का गं. . .?
ईतके का केलेस गं माझ्यासाठी?

पण केवळ एकच खंत आहे मी मात्र तुझ्यासाठी काहीच करु शकलो नाही गं. . .
तुला माझ्याकडून काहिच आनंद देऊ शकलो नाही मी. . .

पण. . .
पण आज वचन देतो मी तुला, " तूझ्याही प्रत्येक अश्रुसाठी लढेन मी. . . ,
देवाशीपण झगडेन
पण तुझ्या आयुष्यातही सुख आणेन मी,
केवळ याच नाही तर प्रत्येक जन्मात तूझा खरा सोबती असेन मी. . ."

आता नाही करत मी तुजा विचार!!!!!

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
......आता नाही वाटत मला भीती , घरात असताना मोबाइल ची रिंग वाजली तर
भीती ताई ने sms वाचायची, भीती आईने फ़ोन उचलायची
आता गरज नाही वाटत मोबाइल सतत जवळ ठेवायची
आता करतो मी फ़क्त माझ्यचं मोबाइल चे recharge
आता नसतात मोबाइल मधे misscall वर misscall
बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
आता असतो मित्रांसोबत , त्यांच्याशी गप्पा मारत , करतो एन्जोय चायनीज पार्ट्या
आता कोणीही म्हणत नाही " आज कसा काय साहेबाना वेळ म्हणाला "
आता असतो मज्याकडे वेळ मंदिरात जायला
आणि नाही वाटत भीती कुणी आपल्या कड़े पहायची
आता मला मोजकेच पैसे न्यावे लागतात shopping ला जाताना
बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
आता दुरावलेले cricket आहे माज्या सोबतीला
आता रमतय माझ मन अभ्यासात , वाटतय त्यात काहीतरी तथ्य
करतोय मी माज्या career चा विचार
आता बांधली आहे मी माझ्या स्वप्नांची माडी
स्वप्नांच्या माडीतले ते स्वनाचे घर , वाट पाहतोय त्या घरात तिची ,
येइल ती , एका दिवशी , माज्या बरोबर लग्नाचे ७ फेरे घेवून बनवेल माझे आयुष्य सुखाचे
बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
जाता जाता प्रेमाचा कठू अनुभव देवून गेलीस,
२१ व्या शतकातील आधुनिक मुलींच्या स्वभावाची ओळख करून दिलीस
आता आहे माझ्याकडे अनुभवाचे गाठोडे , मग कसा फसेन त्या जाळ्यात पुन्हा ?
आता घेणार सात फेरे ते फक्त माझ्या आई च्या समत्तिने ,
१ डाव फसला आहे म्हणुन आता दूसरा आई च्या हातात दिला आहे
नक्कीच तो सफल होयेल, आणि नक्कीच त्याला समर्थांचा आशीर्वाद असेल यात शंका नाही
बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
असे कितीही म्हटले तरी शेवटी तुझ्यावरच कविता करतोय ................... !!!
थोड्या वेळापुरता का होईना स्वताशीच खोट बोलतोय ................... !!!
आणि एकटाच स्वताशी हसतोय ................... !!!
तरीही मनापासून १ खर सांगतोय ................... !!!
" बर झाल तू गेलीस सोडून मला ते ,
आता डोक्याला कसलंच tension नाही आहे
अग तू सोडून गेली पण बघ आज हि डोळे ओले करून गेलीस...

|| बाप्पा ||

|| बाप्पा ||
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला ,

दोन क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी टेकला ,

उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला,

मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला ,

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?

मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस ,

मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक,

तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक,

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो ,

भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो ,

काय करू आता सार मॅनेज होत नाही ,

पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत,

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग ,

तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग ,

चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात,

माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात,

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन,

मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन ,

एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?

डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?

असं कर बाप्पा, एक लॅपटॉप घेउन टाक,

तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक,

म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको,

परत येउन मला दमलो म्हणायला नको,

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश,

माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षिस,

सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप,

ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप.

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं .

म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं.

'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं ',

'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं',

'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव',

'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव ',

'देशील आणून परत माझी हरवलेली नाती ',

'नेशील मला परत जिथे आहे माझी माती ',

'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं ',

'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं ',

'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर ',

'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार ',

'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान',

देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?

"तथास्तु" म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला .

सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला.

चांगला मित्र भेटण खरंच खुप अवघड असतं

मित्रासाठी घासातला घास काढुन
ठेवणं खुप सोप असतं,
मित्रासाठी जिव देणंही,
खुप सोप असतं,
पण जीव देण्याइतपत
चांगला मित्र भेटण
खरंच खुप अवघड असतं

जीवनाच्या वाटेवर आपण एकमेकांचा हात धरला होता

जीवनाच्या वाटेवर आपण एकमेकांचा हात धरला होता
पण का कोणास ठाउक तो नंतर सैल होत गेला
यशाच्या मागे तुला धावायचं होत
पण मला मात्र संसारात रमायचं होत
तरीही तुझ्यासोबत पळण्याचा मी खूप प्रयत्न केला
... अशीच दम छाक होऊन मग तुझा हात माझ्या हातातून निसटत गेला
मी मागे मग कुठेतरी तुझी सावली बनून राहिले
पण यशाच्या ओघात तू या सावलीलाही सोडून दिले
आज तू दूर कुठेतरी हरवला आहेस,आपण एकाच वाटेवर असूनही
अजूनही कोरडीच कशी रे मी , पाउस सोबतीला असूनही?

एकदा ठरवल बाळुने करुया एक अफ़ेअर

एकदा ठरवल बाळुने करुया एक अफ़ेअर
बायको, समाज, सगळ्यांची सोडुन देउ केअर

अफ़ेअर वगैरे करायला बाळुला कधी मिळालच नव्हत
विरहात व्याकुळ व्हायला त्याला कधी जमलच नव्हत

आयुष्याच गाडं त्याच्या छान मार्गाला लागलं होतं
संसाराच गणित एक आणि एक तीन झालं होतं

रोज रोजच्या कटकटींना बाळुचं मन विटलं
साला रोज आपलं जेवणामधे भात आणि पिठलं

म्हणुनच ठरवल बाळुने सरळ एक अफ़ेअर करायचं
शांत एकसुरी आयुष्य थोडं ढवळुन काढायचं

लगेच शोधली बाळुने ऑफ़िसातली फ़टाकडी
शॉपींग सिनेमा भेळ,चौपाटीवर पाणीपुरी

मस्त मस्त स्वप्ने बघत बाळु झोपु लागला
कसा कोण जाणे बाळुच्या बाळीला संशय आला

एक दिवस सहज बाळु लवकर घरी आला
घरामधला सीन बघुन चक्कर येउन पडला

शेजारचा जोशा बसला होता टेचात
फ़िरवत होता हात बाळीच्या केसात

बघताच त्यांना तसे बाळुचे पित्त खवळले
पुढे जाउन जोशाचे मुस्काट त्याने फोडले

रणचंडीसारखी भेसुर हसत बाळी जोरात ओरडली
भात आणि पिठल खाउन माझीही जीभ कंटाळली

ऐकुन तिचे तसले शब्द बाळु भानावर आला
अफ़ेअर वगैरे करायचा विचार त्याने तिथेच गुंडाळला

तेव्हापासुन बाळु रोज सरळ घरी येतो
गुपचुप घरात रोज वरण भात पिठलं खातो

Tuesday, September 20, 2011

प्रेमपत्र- दिल ए नादाँ


तू माझ्या आयुष्यात आलास , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडले. मी प्रथम तुला होकार दिला , तेव्हाही मला वाटत नव्हतं , की मी प्रेमात पडले आहे. या 14 फेब्रुवारीला आपल्या प्रेमाला तीन वर्षं पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं. या तीन वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं... तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही. आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे , की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतं. तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस , असं तुला का वाटतं ? तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस. आज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आज आपण अशा वळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाही. आपला विश्वास , आपलं प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. तू म्हणतोस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत. पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत राहायचं असतं. कधीकधी वाटतं , की तू एवढं करतोस , तर मीच कमी नाही पडणार ना ? कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांग. खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान छान लिहिता-बोलता येत नाही. तू म्हणतोस ना , काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही , त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस , मला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे , ' हृदयाचा ठोका चुकला तरी , तू मात्र चुकू नकोस , प्रेमाचं नातं परी , साथ कधी सोडू नकोस... '

- तुझीच

' रती '
Source: http://mannmajhe.blogspot.com

Monday, September 12, 2011

सुविचार

आजचा सुविचार : रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत
उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच
असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग
येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी
राहतात.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं
धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.

आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात.
संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...

पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता
येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या
प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

सुविचार - १ ते २५०

  १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
  ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
  ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
  ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
  ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
  ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
  ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
  ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
  १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
  ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
  १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
  १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
  १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
  १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
  १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
  १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
  १८) आधी विचार करा; मग कृती करा.
  १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
  २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास
तर जगलास !
  २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
  २२) अतिथी देवो भव ॥
  २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
  २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
  २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका
  २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
  २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं
काहीतरी शिकण्याची संधी असते.
  २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
  २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
  ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
  ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
  ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.
  ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
  ३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
  ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा
पशुची !
  ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
  ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
  ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
  ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
  ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
राजहंस !!
  ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
  ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
  ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
  ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
  ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
  ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
  ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
  ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
 ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
  ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
    ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
    ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
    ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.
    ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
    ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
    ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
    ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
    ५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
    ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
    ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
    ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!
    ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
    ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक
पटीने देव तुम्हाला देईल.
    ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
    ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा
वापर कुणाला करु देऊ नका.
    ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
    ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
    ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
    ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
    ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
    ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
    ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
    ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
  ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
  ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.

८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद
देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही

९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !

९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

९६) अंथरूण बघून पाय पसरा.

९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.

९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची
माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

१००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

 १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

१०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

१०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥

१०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

१०५) विद्या विनयेन शोभते ॥

१०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.

१०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

१०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

१०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

१११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार
आपल्याला नाही.

११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे
हात घ्यावे !

११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करा.

११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

१२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत
त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

१२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

१२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर
जातात.

१२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

१२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

१२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

१२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

१२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

१२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

१२९) ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

१३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

१३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

१३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

१३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं
म्हणजे अमृत मिळणं.

१३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला
दृष्टीकोन व्यक़्त होतो.

१३५) प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

१३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

१३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं
मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

१३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

१३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

१४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

१४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

१४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

१४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

१४४) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

१४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

१४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

१४७) आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

१४८) खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

१४९) जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

१५०) प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

१५१) स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

१५२) आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

१५३) माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

१५४) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

१५५) तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

१५६) शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

१५७) हसा, खेळा पण शिस्त पाळा.

१५८) आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

१५९) स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

१६०) तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

१६१) काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

१६२) काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

१६३) एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार
मिळवत रहा.

१६४) हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

१६५) उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

१६६) या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

१६७) तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !

१६८) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

१६९) दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

१७०) माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

१७१) प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

१७२) व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

१७३) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

१७४) दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

१७५) शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू
नका.

१७६) जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

१७७) दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

१७८) शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

१७९) जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

१८०) परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

१८१) ऎकावे जनाचे करावे मनाचे.

१८२) एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

१८३) केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान
हवं.

१८४) बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

१८५) चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

१८६) तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

१८७) दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

१८८) स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

१८९) स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

१९०) त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे
शिकणे हीच विद्या !

१९१) जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

१९२) दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

१९३) पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

१९४) उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

१९५) जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

१९६) मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

१९७) आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

१९८) मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे
योग्य.

१९९) बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

२००) तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

२०१) गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.

२०२) स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

२०३) प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

२०४) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

२०५) जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

२०६) सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

२०७) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

२०८) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

२०९) मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.

२१०) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली
असते.

२११) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

२१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.

२१३) संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात
असतं.

२१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

२१५) सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला
शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया,
क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित
आहे.

२१६) क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.

२१७) जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

२१८) जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार
करावेच लागतील.

२१९) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

२२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही.

२२१) तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास
ठेवा.

२२२) खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.

२२३) मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.

२२४) पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही
की फसवत नाही.

२२५) ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
 २२६) टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध
रहा.

२२७) प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

२२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

२२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.

२३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

२३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

२३२) शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा
लागतो.

२३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

२३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

१३५) दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

२३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

२३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

२३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

२३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

२४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

२४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

२४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

२४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

२४४) असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

२४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

२४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

२४७) जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा
हक्क नही.

२४८) पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

२४९) मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

२५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो

source: http://mannmajhe.blogspot.com

एक सकाळ....तुझ्या आठवणींची

कोवळ्या किरणातील कोवळ इंद्रधनू होऊनी
श्रावणातील मधुर सकाळ आली.
सुमनानवरचे टपोर दवबिंदू कोवळ्या उन्हात
मोत्यांसम चमकवून गेली.
मोहमयी सकाळी नाजूक तुझ्या आठवणीत हिंडावे
लाडीकपणे त्या आठवणींशी मी उगीचच भांडावे.
गर्द निळ्या अंधाराचे पाश सारुनी
कुशीत पहाटेच्या रात्र हि निजली.
पतंगाने झेपावातच ज्योतीवर
निळी किनार असणारी ज्योत विझली.
सरीतांच्या लहरीवर तरंग उठताना
गोड सूर छेडण्याचा होणारा भास,
अथांग निळ्या सागरात उसळनार्या लाटेला
जशी लागते किनार्याची आस.
सौख्यादायी वातावरणात प्राण्याच गीत फुलत
विरहाच दुख हृदयामध्ये जस कायमस्वरूपी सलत


........मनापासून
२३/६/२०१०
source: http://manapasunfakttuzasathi.blogspot.com

'तू' जवळ आलीस तेव्हा

घन हे सारे दाटुन आले
'तु' जवळ आलीस तेव्हा
मेघ हे बरसुन गेले
'तू' जवळ आलीस तेव्हा

भाव डोळ्यातून वाहले

'तू' जवळ आलीस तेव्हा
शब्द ओठातच राहले
'तू' जवळ आलीस तेव्हा

स्पंदनाचे नाद ऐकू आले

'तू' जवळ आलीस तेव्हा
दोन जीव एक झाले
'तू' जवळ आलीस तेव्हा

नजरेला बहर आला

'तू' जवळ आलीस तेव्हा
प्रणयाचा कहर झाला

मनापासून