Tuesday, August 2, 2011

घरी असताना कधी घरच्यांचं महत्व कळलंच नाही


घरी असताना कधी घरच्यांचं महत्व कळलंच नाही
आज मात्र क्षणोक्षणी त्यांचीच आठवण येते........
अन डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही

नेहमीच असा वाटायचं कि घरापासून लांब जावं
थोडसं आयुष्य को होईना स्वतः च्या पद्धतीने जगावं

आजही तो दिवस स्मरणात आहे
जेव्हा पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर आलो
आपलं म्हणणारे मित्र भेटले हे नक्कीच
पण आप्तांसाठीच मी परका झालो

नवीन कॉलेज,नवीन मित्र ....,सारकाही नवीन होतं
या मायानगरीत मी हरवणार तर नाहीना असाच नेहमी भासत होतं

दररोज आईबाबांचा फोन यायचा
अन पहिला प्रश्न हाच असायचा " तिकडे सर्व ठीक आहे ना ?"
मीही फक्त "होय" म्हणायचो अन डोळ्यात आलेले अश्रू चटकन सावरून घ्यायचो
पण माहित नाही आईला कसं काय कळायचं
ती मला लगेच विचारून घ्यायची "तुला काही त्रास तर नाहीना"
मी म्हणायचो छे छे "त्रास"........ नाही माझा जरा घसा बसलाय

मी खोटं बोलतोय हे आईलाही कळायचं फोनवर बोलताना हृदय तिचही गहिवरून यायचं
चटकन मग "बाबा" आईकडून फोन घ्यायचे
अन मला धीर देवून......."इकडे सारकाही अगदी व्यवस्थित आहे
तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे आणि स्वतः ची काळजी घे "असं सांगायचे

आज मी घरी अधूनमधून जातो पण पाहुणा म्हणून
अन लगेच परत निघून येतो कॉलेज असतं माझं म्हणून
खरच आता नकोसा झालाय हा एकटेपणा अन हे शिक्षण
नेहमीच घरच्यांची आठवण येते नकोसा वाटतो क्षणक्षण

घराबाहेर टाकलेलं हे पाउल म्हणजे यशसंपन्नतेच शिखर
गाठण्यासाठी केलेली वाटचाल कि शिक्षा हेच मला कळत नाही

खरचं.............
घरी असताना घरच्यांचं महत्व कधी कळलंच नाही......

No comments:

Post a Comment