Tuesday, August 30, 2011

बायकांचे नखरे...जे तुम्ही सांगणार..ते.

नवरा: आज जेवायला काय बनवशील?
बायको: जे तुम्ही सांगणार ते.
नवरा: वरण भात बनव
बायको: कालच तर बनवलं होतं ते
नवरा: मग भाजी आणि चपाती बनव
बायको: मुलं नाही खात ते
नवरा: मग छोले आणि पुरी बनव
बायको: मला ते जड वाटतंय
नवरा: अंड्याची भुर्जी बनव
बायको: आज गुरुवार आहे
नवरा: पराठे?
बायको: रात्री कोणी पराठे खत का?
नवरा: चल हॉटेल मधूनच मागउ
बायको: रोज रोज हॉटेलचं खाणं बरं नाही
नवरा: कढी आणि भात?
बायको: दही नाही आता
नवरा: इडली-सांबर?
बायको: त्यात वेळ लागेल आता, आधीच सांगायचं नाही का
नवरा: चल ठीक आहे म्यागीच बनव, त्यात वेळ नाही लागत
बायको: ते काही जेवण आहे?
नवरा: मग आता काय बनवशील?
बायको: जे तुम्ही सांगणार..ते...


तू कॉल करणार होतास..

संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..

भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..

शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..

झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..

सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन....की....आपलं नातं ?
                                      --- XYZ

Monday, August 22, 2011

तू भेटलीस तर ठीक........

तू भेटलीस तर ठीक........

मुलांनो, मुलींना कधी Serious घेवू नका , Time pass करा ...
Serious जर घ्याल तर नक्कीच फुक्कट मराल...
Time pass कराल तर राहाल आयुष्यात सुखी ,
भेटली तर पारो नाहीतर चंद्रमुखी ...
शेवटी पारो किवा चंद्रमुखी कोणाचीच जागा Fix नसते ,
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

मुलांनो , लग्नासाठी बोलू नका , Propose मारा
शेवटी लग्नासाठी एकतर "पती परमेश्वर" नाहीतर कायमचा "रामेश्वर"
Propose मध्ये होकार मिळाला तर ठीक ....
नाहीतर मैत्री तर उरलेलीच असते ,
मैत्री मध्ये थोड्याच दिवसात पोरगी हसते
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

मुलांनो Love करू नका, पण Try जरूर करा
शेवटी प्रेमात "हो" किवा "नाही" असते ,
प्रयत्नात "हि" नाहीतर "ती" असते
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

पण काय सांगू मित्रांनो...., सर्वांची "ती" अशीच असते
कधी स्वतःहून येत असते तर कधी जबरदस्तीने जात असते ...
कारण तुमच्या त्या वेडीलाही प्रेमाची खरी गम्मत माहित नसते ....
म्हणून सांगाच त्यांना ....
तू भेटलीस तर ठीक नाहीतर तुझी मैत्रीण तयारच असते....

गोविंदा आला रे आला

ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम
गोविंदा रे गोपाळा

गोविंदा आला रे आला
गोविंदा ! गोविंदा ! गोविंदा

वाकड्या गल्लीचा नाक्यावरचा
आला नाचत गोविंदा
ओतून पाणी करूया स्वागत
नाचूया ताता ता थैया
गोविंदा आला रे आला

ताई माई बघा
आम्ही जमलोय सारे
दही दूधाची होऊ दया
धमाल बरसात रे
गोविंदा आला रे आला

मोरपिस रोवतो फेट्यात
छोटा मुकूंद बाळा
हंडी फोडायचा त्याला
बघा लागलाय चाळा
गोविंदा आला रे आला

थरावर थर चढती सरसर
सजल्या हंडीवर गोविंदाची नजर
गार गार पाण्याने वाजतेय थंडी
एक दोन तीन चार फुटली बघा दहीहंडी
गोविंदा आला रे आला

अरे एक दोन तीन चार
वाकड्या गल्लीची पोरं हूशार
गोविंदा आला रे आला
ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम

- देवनिनाद

आपणा सर्वांना श्री कृष्णजन्माष्टमीच्‍या हार्दिक शुभेच्छा !!!

गोविंदा आला रे आला

ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम
गोविंदा रे गोपाळा

गोविंदा आला रे आला
गोविंदा ! गोविंदा ! गोविंदा

वाकड्या गल्लीचा नाक्यावरचा
आला नाचत गोविंदा
ओतून पाणी करूया स्वागत
नाचूया ताता ता थैया
गोविंदा आला रे आला

ताई माई बघा
आम्ही जमलोय सारे
दही दूधाची होऊ दया
धमाल बरसात रे
गोविंदा आला रे आला

मोरपिस रोवतो फेट्यात
छोटा मुकूंद बाळा
हंडी फोडायचा त्याला
बघा लागलाय चाळा
गोविंदा आला रे आला

थरावर थर चढती सरसर
सजल्या हंडीवर गोविंदाची नजर
गार गार पाण्याने वाजतेय थंडी
एक दोन तीन चार फुटली बघा दहीहंडी
गोविंदा आला रे आला

अरे एक दोन तीन चार
वाकड्या गल्लीची पोरं हूशार
गोविंदा आला रे आला
ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम

- देवनिनाद

आपणा सर्वांना श्री कृष्णजन्माष्टमीच्‍या हार्दिक शुभेच्छा !!!


Thursday, August 11, 2011

Happy Independence Day

Ye baat hawao ko bataye rakhna,
Roshni hogi chirago ko jalaye rakhna ,
Lahu dekAr jiski hifazat humne ki…..
aise TIRANGE ko sada Dil me basaye rakhna….
Happy Indian Independence Day

Wednesday, August 10, 2011

2 ग़ज़ल आज मै उन तमाम दोस्तों को समर्पित

ये 2 ग़ज़ल आज मै उन तमाम दोस्तों को समर्पित कर रहा हूँ जो दोस्ती के पवित्र रिश्ते में विश्वास रखते हैं...

[1] "ऐ दोस्त तेरी दोस्ती का रिश्ता बहुत गहरा है.....!!"

..."महक दोस्ती की इश्क से कम नहीं होती
इश्क से ज़िन्दगी ख़तम नहीं होती..
अगर साथ हो ज़िन्दगी में अच्छे दोस्त का
तो ज़िन्दगी जन्नत से कम नहीं होती...!!

सितारों के बीच से चुराया है आपको
दिल से अपना दोस्त बनाया है आपको
इस दिल का ख्याल रखना...
क्योंकि इस दिल के कोने में बसाया है आपको..!!

अपनी ज़िन्दगी में मुझे शरीक समझना
कोई गम आये तो करीब समझना ..
दे देंगे मुस्कराहट आंसुओं के बदले
मगर हजारों दोस्तो में अज़ीज़ समझना .. !!

हर दुआ काबुल नहीं होती
हर आरजू पूरी नहीं होती...
जिन्हें आप जैसे दोस्त का साथ मिले
उनके लिए धड़कने भी जरुरी नहीं होती..!!

कोशिश कीजिए हमें याद करने की
लम्हे तो अपने आप ही मिल जायेंगे...
तमन्ना कीजिए हमें मिलने की
दोस्त , बहाने तो अपने आप ही मिल जायेंगे..!!"

[2] "प्यार का है नाम दोस्ती...!!"

"हर पल फुहार प्रेम का झरता है जो दिल पर
यारों उसी फुहार का है नाम दोस्ती...

जो दूर कितने ही हों पर, दिल में पनपती है
बंधन अटूट प्यार का है नाम दोस्ती...

ये द्वेष रहित प्रेम भरे सैकड़ों पुष्पों
की एक बनी हार का है नाम दोस्ती..

जिस मिलन की रुत में सभी लोगों के दिल मिलें
उस मौसमी बहार का है नाम दोस्ती..

कहता "आनंद" कुछ नहीं संसार में ऐ दोस्त
बस तेरे मेरे प्यार का है नाम दोस्ती..

है दोस्ती इंसान का भगवान् से मिलन
उस सांवले सरकार का है नाम दोस्ती..!!"

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो (Flash Back )

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

Sunday, August 7, 2011

EMOTIONS OF COMMON MAN


क्षणभर तुझा हात हाती घेतला

क्षणभर तुझा हात हाती घेतला
मनाला किती बरे वाटले होते,
जणू साऱ्या जगाशी लढण्याचे
बळच तेव्हा मला मिळाले होते.

तुझ्या डोक्यात असंख्य विचारांचे
काहूर त्यावेळी माजले होते,
मला मात्र तुझ्या डोळ्यात
पूर्णपणे बुडून जावेसे वाटत होते.

तू होतास स्वत:शीच झगडत
सारे मला कसे समजवावे,
मला वाटले निदान आतातरी
माझ्या मनातले भाव तुला कळावे.

मनात सहजच आले
हळूच तुझ्या कुशीत शिरावे,
या हृदयाचे त्या हृदयाला
काही न बोलताच सारे कळावे.

पण पुन्हा माझ्या स्वप्नांनी
माझा घात केला,
जेव्हा सर्व गोष्टींचा तू
अखेर उलगडा केलास.

समजत होती प्रेम
मी इतके दिवस ज्याला,
फक्त निखळ मैत्रीचे नाव
तू दिलेस अखेर त्याला.

दोष तुझाही नव्हताच म्हणा
तू होतास परिस्थितीचा गुलाम,
माझ्याच मनावर योग्यवेळी मी
घालायला हवा होता लगाम.

पाठीवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा ........

ओळखलत का सर मला ? पावसात आला कोणी ...
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी …

क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून ..
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून …
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली ..
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली …
भिंत खचली , चूल विझली, होते नव्हते नेले ..
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले …

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे ..
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे …
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला ..
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला …
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..
पाठीवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा ........

Friday, August 5, 2011

myaaav 2


तुझेही पाय मातिचेच असतिलयाची

तुझेही पाय मातिचेच असतिलयाची
जाणिव आधिच होतीम्हणुनच
तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !

तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते.

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

कळलच नाही कधी
मलातुझ ते आतल्या आत जळण
जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
तुझ एकटीचच तरफडण

जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
कारण तुझी कळी कधी खुललीच नाही
मिट्लेल्या ओठामागची
निःशब्द भाषा कळलीच नाही

ओठ जरी माझे मिटलेले
डोळे मात्र उघडे होते
तू ओठातून फूटणार्‍या शब्दाची वाट पहिली
पण डोळ्यानी ते कधीच वेक्त केले होते....

डोळ्यांनी व्यक्त केलेस
ते डोळ्यानिच ऎकले
पापण्या मिटता मिटता
आसवांनीच टिपले

आसवांची फुलेच दिलीस मला तु
मौन राखिले तरीका डोळ्यात तु
ज्या सदा प्रश्नभाव
राजसा प्रीत माजी हि खरी

खरी जरी असेल प्रित तुझी...
का केली नाही तु व्यक्त...
सदा वात बघण्यात तुझी...
आटले माझ्या देहाचे रक्त...

अव्यक्ताला व्यक्त होण्याची
वाट मीही पाहिली
तू या वाटेवर वळण्या आधिच
मग ही वाट का ग संपली

मी तर तेथेच होते वाट बघत....
तुझिच नजर ना वळली....
प्रित मझ्या मनाची सदा...
तुलाच ति का न कळली???

वाट होती अजून शिल्लक
प्रवासच संपला
ज्याचा त्याचा वाटा जितका
त्याचा त्याला मिळाला.

ना काही हसत शिकलो
ना काही रडत शिकलो
चालायचे तर मी
पडुन पडूनच शिकलो

कधी तरी आठवणींचा पट खुलतो ,
तुझा माझ्या प्रेमाचा मग डाव रंगतो
विसर मनाला कितीदा मी सांगतो
ते ही हट्टी सारे सोडून त्यामागेच धावतो

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी
छत्तीसचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.

प्रतेक गावाबाहेर
छोटा महारवाडा आहेच
वथीच्या पुस्तकात मात्
रसमानतेचा धडा आहे.

इथे वेडं असण्याचे
खुप फायदे आहेत
शहाण्यासाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत.

संध्याकाळच्या रंगीत आकाशात
जेव्हा दिशा भरकटून जातात
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
घरट्याकडे परतू लागतात

ओठांवर ओठ टेकवताना
भान दुनियेचं ठेवायचं नसतं
तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा
डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं

आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात
तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो
गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
ही भावनांची गुंतवणूक असते
मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात
त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते

रात पुनवेची तारे आटून गेले,
प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.
लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,
रंग नभी पंचमी दाटून गेले.

एकटी स्वप्न माज़ी,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा...

भरल्या होत्या इथे हजार मैफ़ीली
सुर माझा कधी वाजलाच नाही
मी खेळलो कीत्येकदा रंग स्वरांचा
पण रंग माझा कुणासही लागलाच नाही...

लिहून दाखवले तरी कलले नाही,
बोलून दाखवले तरी कलले नाही,
तू त्याच्या सोबत निघून गेलीस तेव्हा कलले,
ते तुज्या पर्यंत कधी पोहचलेच नाही...

घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला

चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पणतीला ते जमणार नाही

गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात

रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती........

नाही म्हणाले नसले तरी
हो सुद्धा बोलले नाहीतो
विचारून थांबला तरी
मला काही सुचले नाही ....

तू सोडून जाशील म्हणुन
मी वेडी झाली होती

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी….



          कि-बोर्ड च्या बटनांच्या आवाजाने संपुर्ण आसमंत भरुन गेलेला आहे. वातावरणात एक प्रकारचा तणाव, कायमचाच भरलेला असतो. बाहेरच्या ऍटेंन्डन्स बोर्डला गळ्यातल्या कार्डने नोंद करुन काचेचे दार उघडुन आत आले की हा लगेच तणाव जाणवतो.

भयाणं.. अंगावर दडपण आणणारा..

आपल्या मागे काचेचे दार बंद होते आणि आपला आणि जगाचा जणु भौतीक संपर्कच तुटतो. काळ्या काचेच्या खिडकीतुन बाहेरील वेळ कळणे केवळ अशक्यच असते. बाहेर उन आहे का पाऊस आहे, वादळ आले का जगबुडी झाली, जोपर्यंत ती बातमी इंटरनेट वर येणार नाही तोपर्यंत आतील लोकांनी त्याबद्दल काही कळण्याचा काही मार्गच नसतो.

शनिवार-रविवारची जोडुन आलेली सुट्टी सुध्दा चेहऱ्यावर प्रसन्नता आणु शकत नाही.

इन-बॉक्स मध्ये ऑर्कुट, फेसबुक वर आलेल्या मित्रांच्या नोंदीची मेल्स असतात. पण वाचत बसणे जवळ जवळ अशक्यच होऊन गेलेले असते. कारण साता-समुद्रापार बसलेल्या क्लायंटच्या विकेंड्ची सुरुवात अनेक कामं ऑफ्लोड करुन झालेली असते.

कामाच्या दडपणाचे भुत क्षणाचाही विलंब न करता मानगुटीवर चढुन बसते.

बोटं कि-बोर्ड वर सराईतपणे फिरु लागतात. प्रोजेक्ट मॅनेजरची लाल-उद्गारवाचक चिन्ह असलेली महत्वाची मेल प्रोजेक्ट 'येल्लो फ्लॅग' मधुन 'रेड फ्लॅग' मध्ये गेल्याची बातमी देत असते.

भितीची एक लाट अंगावरुन धावत जाते. कुणाला घाम फुटलेला असतो तर कुणी भितीने आधीच गारठलेले असते. थिजलेल्या शरीराव ए/सी चा थंडगार वारा काटे आणत असतो.

'कॉफी?' संगणकाच्या पडद्यावर बाजुच्याच क्युब मध्ये बसलेल्या मित्राचा मेसेज फडफडतो. शरीरावर चढत असलेले दडपण दुर करण्यासाठी तुम्ही उठण्याचा विचार करता, पण समोर साठलेला कामाचा ढीग पाहुन,

'नो यार, बिट बिझी! लॅटर'

'ऑल राईट, सी या'

तुमची विनोद बुध्दी जागृत होते, तुम्ही तेवढ्यात त्याला म्हणता, 'cya म्हणु नकोस, त्याचा अर्थ वेगळा होतो, खोटं वाटते तर गुगल वर cya शोध'

तुम्ही मान उंचावुन त्याच्याकडे बघता, त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव बघुन तुम्हाला हासु येते.. क्षणीक.. आणि परत कामात मग्न होता.

दरवेळी मदतीला हमखास धावणारे गुगल नेमके आजच बावचळल्यासारखे करत असते. मिळणारे अनेक पर्यायांपैकी एकही तुम्हाला उपयोगी पडत नसतो. तासभर प्रयत्न केल्यावर तुमची चाळवा-चाळव सुरु होते. तुम्ही पुन्हा एकदा मान उंचावुन बघता.

दुसऱ्या क्युबीक मधील एका कन्येशी तुमची नजरानजर होते. ती दोन्ही डोळे मिचकावुन एक हास्य फेकते. तुम्ही हास्य देऊन परत इतरत्र पाहता. मानेवरुन फिरणारे हात, नखांचे कुरतडणे, बोटांची टेबलावर लयबध्द टिक-टिक. प्रत्येकाचंच घोडं कुठेना कुठे अडलेले असते.

संगणकाच्या पटलावर पुन्हा एकदा मेसेज फडफडतो.. 'कॅन यु कॉल मी नाऊ' क्लायंट उगवलेला असतो. तुम्ही चरफडता. 'साले, रात्री झोपत नाहीत का? यांना ना नवरे ना बायका, मोकाट सोडलेल्या वळु सारखे फिरत असतात.'

कॉल सुरु होतो.. तो बोलत असतो, तुम्ही ऐकत असता. कॉल संपतो. तुम्ही चरफडत बाहेर येता. प्रोजेक्ट मध्ये थोडा बदल असतो ज्यामुळे तुम्ही केलेले खुप सारे काम स्क्रॅप झालेले असते. पुन्हा नविन सुरुवात, पुन्हा नविन उमेद.

आठवड्याचे चार दिवस सतत १२-१६ तास काम करुन तुमचा कलीग थकलेला असतो. शुक्रवारी तरी घरी वेळेवर जाऊ या विचारात असतानाच एक 'एस्कलेशन' येते. तो जाम वैतागलेला असतो. क्लायंटला कळकळीच्या स्वरात विचारतो, 'आठवडाभर १६ तास काम केले आहे, एक्सलेशन p2 च आहे, सोमवारी बघीतले तर चालेल का?'

थोड्यावेळाने तुमच्या बॉसला क्लायंटचा फोन येतो, 'आमचे कॉन्ट्राक्ट तुमच्या कंपनीशी आहे, तुमच्या एखाद्या इंजीनीयरशी नाही. तो १२ तास काम करतो का १६ तास त्याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, तुम्ही मागता तेवढे पैसे आम्ही देतो, आम्हाला आमचे काम वेळेवर करुन हवे.'

शुक्रवारची संध्याकाळ सोडाच, आता शनिवार-रविवार सुध्दा त्याचा राहीलेला नसतो.

'बाबा मला सायकल शिकवा ना..' पोराची आर्त विनंती या आठवड्यात सुध्दा अर्धवटच रहाणार या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी तरळते.

दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. बायकोने डब्यात प्रेमाने दिलेले अन्न ए/सी मुळे गारठलेले असते. एव्हाना तुमची खाण्यातुन वासना गेलेली असते. डबा परत कसा न्हायचा म्हणुन तुम्ही कसंबसं पोटात ढकलता.

क्षणभर विरंगुळा म्हणुन आलेल्या स्क्रॅप्स, ट्विट्स, मेसेजेसला तुम्ही पटापट उत्तर देऊन टाकता. बॅकेच्या स्टेटमेट्स वर एक नजर जाते. काहीच उरलेले नसते. गलेलठ्ठ दिसणारा पगार इनकम-टॅक्स नामक अक्राळ-विक्राळ भस्मासुराने आधीच गटकलेला असतो. उरलेला पैसा इ.एम.आय ने महीन्याच्या पहिल्या आठवड्यातच उचललेला असतो.

कुणाच्या घरात बारसं, कुणाचे पहिले वाढदिवस, कुणाच्या ऍनीव्हर्सरी, तर कुणाच्या पालकांची साठीचे कार्यक्रम ठरत असतात. तुमच्या दृष्टीने पंचांगाची किंमत शुन्य असते. महत्वाचे असते ते प्रोजेक्ट डेडलाईन्सचे कॅलेंडर.

तुमच्यापैकीच कोणी परदेशात स्थाईक झालेले असता. आपला आनंद, आपले सुख तुम्ही निसर्ग-रम्य स्थळांभोवती, बर्फामध्ये फोटो काढुन, हॅलोविनचे भोपळे हातात घेऊन काढलेले फोटो सोशल-नेटवर्कींग वर शेअर करुन मित्र-मंडळींना जळवु पहाता. तुमच्याकडे बोलण्यासारखे सांगण्यासारखे खुप काही असते. परंतु दिवाळी-दसरा, रक्षाबंधन, श्रावण-सणाला तुमच्याकडचे शब्दच थिजुन जातात. शेअर करण्यासारखे काहीच रहात नाही.

कुठुन आय.टी. मध्ये आलो.. पश्चातापाचा एक विचार पुन्हा एकदा डोक्यात तरळुन जातो. मित्राने एकदा सांगीतलेले असते, 'अरे तुला माहीत आहे, तो शंकर महादेवन आहे ना, तो संगणक तज्ञ होता आधी!, ओरॅकल मध्ये कामाला होता. पण तो वेळीच बाहेर पडला. आता बघ तो कुठे पोहोचला!.'

तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आठवतात. 'लकी गाय', त्याला शक्य झाले, आपणं कधी बाहेर पडु शकतो या जंजाळातुन?

मौत का कुवा! डोक्यात जुन्या आठवणी जाग्या होतात. तो मोटारसायकल वाला त्या विहीरीत गोल गोल फेऱया मारत असतो. प्रचंड वेगाने, तेच तेच, त्याच त्याच गोष्टी, परंतु प्रचंड एकाग्रता. एक छोटीशी चुक, एक क्षण विश्रांती आणि होत्याचे नव्हते होऊन जाऊ शकते.

थांबला तो संपला….

समोरच्या भितीवर लावलेल्या अनेक देशांमधील वेळ दाखवणाऱ्या घड्याळांचे काटे फिरत असतात.. न थांबता.

कंटाळवाण्या मिटींग्ज्स, ट्रेनींग सेशन्स, निरर्थक बडबड डोक्यावर आदळत असतात. तुमचा मौल्यवान वेळ वाया चाललेला असतो.

तुमच्याच ग्रुप मध्ये एक नविन 'बकरा' रुजु झालेला असतो. आज पहिलाच दिवस असतो. घड्याळात ७ वाजलेले बघुन तो आवरा-आवर करुन बाहेर पडत असतो. तेवढ्यात मॅनेजर त्याला गाठतो..

'जा रहे हो?'

'हा सर!'

वेळ माहीत असुनही घड्याळात एक कटाक्ष..

'अच्छा ठिके.. जाओ.. वैसेभी तुम्हारा आज पहेला दिन है.. आदरवाईज, धिस इज जस्ट अ हाल्फ डे, इजंट इट?'

त्याची ती थंडगार स्माईल पुन्हा एकदा सर्वांगावर काटा आणते..

 

..वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी….

 

Thursday, August 4, 2011

मी काळाला एक संधी देतो आहे

मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे
तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी…!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे…

प्रयत्न तर खूप केले आणि करतोही आहे मी
की तुझे नाव घेताना तुझ्यावाचूनही
मन गाभार्‍यासारखे गंधित होत राहावे
पण
तळहातीच्या रेषांसारखे चिकटून बसलेले
काही शब्द, काही घटना
हाणून पाडतायत माझा बेत
असो ! ढासळलेल्या बेतांचा एक डोंगर साचलाय इथे
त्यात ही काडी काही जड नव्हे…!

नशिब हातात नसले तरी
प्रार्थना आहे!
आणि माणसाच्या स्मरणशक्तीपेक्षा
विस्मरणशक्तीवर माझा भरवसा आहे…

तो ही तूटणार असेल कदाचित;
पण तोवर
मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे…

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी,
हातात हात घालून फ़िरणारी
मलाही girl friend मिळावी...

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी,
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी...
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी,
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...

चौपाटीवर पाणीपूरीतून
प्रणयाचेच घास भरवू,
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ,
आयुष्यातील सारी दु:खं
जिच्या सहवासात टळावी,
हातात हात घालून फ़िरणारी
मलाही girl friend मिळावी...

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend...
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी,
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...!

त्यादिवशी तू हातात माझा हात घेतलास हाती

त्यादिवशी तू हातात माझा हात घेतलास हाती
म्हणालास नको ना जाऊस थांब ना जराशी ....
डोळे तुझे होते दुखी नव्हता त्यात खट्याळपना
वाटले तुला घ्यावे कवेत नि विचारावे
काय झाले रे माझ्या राजाला
तू शांत होतास पण तुझे डोळे बोलत होते
व्यथा तुझ्या मनाची सांगत होते
मी म्हणाले सांग ना रे आहे मी इथेच तुझ्याजवळ
घरच्यांनी पाहिलीये एक मुलगी वदलास तू
हसून मी म्हणाले अरे इतकेच ना
नकोस घेऊ tension मी देईन ना तुला tution
नाही कसे म्हणयचे आणि नाही कसे म्हणवून घ्यायचे
करतेय हेच तर मी गेले ३ वर्ष आपल्यासाठी
तू म्हणालास नाही ग तू समजतेयस
कसा मी जाऊ मनाविरुद्ध ज्यांनी दिला मला जन्म
........ मी शांत हतबुद्ध ..... हरवले माझे शब्द
समजेना मला ओळखते का मी याला
ज्याच्यासाठी गेले ३ वर्ष मी दुखावतेय माझ्या जन्मदात्यांना
जो होतो आनंदी जेव्हा सांगते हेच मी त्याला रडवेली होऊन
ज्याने समजावंलेय मला अग प्रेम करतेस ना माझ्यावर
प्रेमात असेच असते मी आहे ना तुझ्यासोबत
मी एकवटले माझे बळ आणि बोलले
अरे पहिल्यांदाच पाहतायत ना ते तुझ्यासाठी?
सांगून तर पहा ना त्यांना आपल्याबद्दल
.... बोलला तू नाहीस पण नकार स्पष्ट होता तुझ्या डोळ्यात
मी हरले होते का प्रेमात कि असेच असते प्रेम अपूर्ण? एकतर्फी?
.... समजला प्रेमाचा खरा अर्थ ..उशीर खूप झाला होता आयुष्य संपले होते
प्रेम नसते काळजी तर तो असतो आत्मविश्वास काळजी घेण्याचा
प्रेम नसते जवळीक तर तो असतो आत्मविश्वास नेहमी जवळ ठेवण्याचा
प्रेम नसतेच झुरणे तर ती असते मिलनाची ओढ नेहमीसाठी
हा आत्मविश्वास हि हिम्मत हि ओढ तर नाही ह्या माणसात
अरे हे तर प्रेमच नाही.... क्षणात मोकळी झाले मी
दुखावले तर होते पण ठेच लागून शहाणी झाले होते मी .........

पुन्हा आज एकदा हि सुंदर अशी पहाट, नजरेला सुंदर नाही वाटली

पुन्हा आज एकदा हि सुंदर अशी पहाट, नजरेला सुंदर नाही वाटली.

रात्री तुझ्या तो आठवणीतला प्रत्येक क्षण साक्ष देतोय या लाल सुझलेल्या डोळ्यांची.
आणि माझ्या हृदयाचा प्रत्येक भाग सांगतोय मनात तू आणि तूच वसल्याची.

तुझा नाव घेण्याचा तर निम्मित होतं काल मित्राचा,
पण काय करावा या मनातल्या तुझ्या सुंदरश्या चित्राचा.

बोल कधी पाऊसात तू भिजताना मला आठवलस,
नाही तर नेहमीच पाउसाचा पाणी अश्रुंपोटी साठवलस.

नवीन नवीन प्रेमाचे सुरुवातीचे दिवस काही छान होते,
नंतर हळू हळू कळला आता त्याच निवडक दिवसांची हृदयात खान होते.

आधी वाटायचा...
प्रेम म्हणजे तुझ्या माझ्या मनातला गानं,
कि तुझा माझ्या नजरेत... आणि माझा तुझ्या नजरेत कायमचा राहणं.

काय होतं ते...
माझ्या फुटबॉलच्या गप्पांवर पण तुझा ते माझ्यासोबत बसणं,
आणि मला शोप्पिंग नाही आवडत सांगून पण माझा तुझ्यासोबत असणं.

मीच बदललो असतो तर नवल..
मीच बदललो असतो तर नवल..
तुझा स्पोर्ट्स चैनेल TV वर शोधणं मला कळत नसणार...
नाही तर असा म्हणतो,
कुठे तरी उद्या तो काय बोलेल, याचीच गोष्ट मनात घोळत असणार

मला जे वाटतंय,ते तुला वाटत असेलही कदाचित,
अश्रुंसोबत आठवणीत काही रात्री जातीलही कदाचित,

मी कुठे बोलू पुन्हा, माझा काय चुकलेला..
हाच प्रश्न घेऊन दोघांचा मन ते रुसलेला...

विसरणार..
विसरणार म्हणून काय प्रेम पुसून जात नसता गं,
तुझी आठवण पुसायला मित्रांची ती धडपड रोज दिसते गं.

पुन्हा कधी तरी भेटायची आस ती आजवर आहेच,
तुझ्याही अडचणींची जाण ती कुठे तरी आहेच,

आज नाही तर उद्या ती...भेट होईलच ना तशी,
माझ्या आठवणीत घर करून बसलेली जुनी गर्लफ्रेंड हि अशी....!!

आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी मनापासुन आवडल होत

आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी मनापासुन आवडल होत,

खरच तीच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत

पहीले आम्हा दोघांमध्ये फक्त मैञीच नात होत,

नंतर माञ तीच वागण बोलण मला आवडत गेल होत.

एके दिवशी सकाळी तीला माझी बनशील का अस विचारल होत.

तीने माञ उत्तर न देताच निघण पसंत केल होत.

2 दिवसांनी माञ तीने उत्तर नाही अस दिल होत,

मैञीच नात माञ पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत.

हळु हळु माञ तीच्या मैञीच गोड विष प्याव लागत होत,

विसरता येत नाही म्हणुन मैञीवर समाधान मानाव लागत होत.

नंतर माञ आयुष्य संपवावस वाटत होत,

पण तीला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत.

इतरांसाठी माञ माझ प्रेम एकतर्फी होत,

पण मी माञ तिच्यासाठी प्रेम साठवुन ठेवल होत...

बदलत चालले जग सरे, नाही इथे कुणी कुणाचा

बदलत चालले जग सरे, नाही इथे कुणी कुणाचा
स्वार्थी बनत चालला माणूस, काळ बदलतोय माणुसकीचा.....

ज्यांनी केले लहानाचे मोठे, त्यांना आज मुले विसरली
स्वता राहिले उपाशी तापाशी, मुलांच्या जीवनात सूखे भरली
रात्रण दिवस मेहनत करुनी, स्वता ओढली दुखाची सावली
त्याच मुलांनी घरा बाहेर काढुनी, गळा घोटला मनवतेचा.....

हीच आहे का आजची पीढी, प्याशन पैशापाठी धावत चालली
आई वडीलांनी घाम गालुनी, मुलांसाठी अनेक स्वप्न पाहीली
यांच मुलांनी हाकलून देताच, स्वप्न यांची अश्रुंनी वाहीली
अरे देव कोणी पाहीला नाही, पण देवारा असतो हा प्रतेक घरचा.....

भरत चालली आज वृध आश्रमे, जड वाटू लागले आई बाप
उतरत्या वयात सहारा छिनूनी, मुले करतात मोठे पाप
आई वडिलांना पैशाने तोलतात, विसरून जातात कर्तव्याचे माप
काय म्हणायच या पिढीला, स्वार्थ आहे हा आंधळे पणाचा.....

देवालाही जे जमले नाही, ते दिले आज आई वडिलांनी
पैशापुढे सर्व विसरले, मुले नाही त्यांची ऋणी
मुले असून नसल्या सारखे झाले, अनाथ झाले हे म्हातारपणी
आजच्या पिढीस सागने आहे, अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....

उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास

उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झरत राहीलास
सागं कधी जगलास का ते उद्याच जिवन तु आजवर?
आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास

मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु
सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस?

एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप
अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस
आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज

तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो
आणी एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं
हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.

आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी
तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी
सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा
तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी?

सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल?
हातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी

बघ आजही तरी तुला चीतां पुन्हां त्या उद्याचीच
दंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.

प्रेम कराव म्हणतोय...

प्रेम कराव म्हणतोय...
पण,कलालय अर्थ प्रेमाचा इतका,
की तस कोणी मिलालच नाही...शोधाव म्हणतोय..!!
म्हणून प्रेमाचिया बाजारी,
निघालोय ह्रदय घेउनी ...!!

मनात घेउनी भावना प्रेमाच्या, म्हणतोय
कोराव नाव आपलही कोणी,
झाडाचिया खोडावर... विशाल खडकावर...
म्हणून प्रेमाचिया बाजारी,
निघालोय ह्रदय घेउनी ...!!

पाहिले रंग, पाहिले रूप या जगी,
नाही कलाला भाव प्रेमाचा, या बाजारी.
म्हणून धरलिया वाट पुढाचिया बाजारी.
म्हणून प्रेमाचिया बाजारी,
निघालोय ह्रदय घेउनी ...!!

पण,कलियुगाच्या याही बाजारी,
कलाल्या नाही कोणास भावना
माझिया प्रेमाच्या...
म्हणून प्रेमाचिया बाजारी,
निघालोय ह्रदय घेउनी ...!!

अजूनही,प्रेम कराव म्हणतोय...
पण,कलालय अर्थ प्रेमाचा इतका,
की तस कोणी मिलालच नाही....!

आज खुप एकट-एकट वाटतय


आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..

चिंब पावसात भिजावस वाटतय,
तुझ्या हाताला धरून नाचावस वाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..

भिजल्या अंगानी तुला मिठीत घ्यावस वाटतय,
गार पडलेल्या अंगाला थोड गरम करावस वाटतय,
बेभान वारयाबरोबर धावावस वाटतय,
जगाला विसरून वेगळ काही कारावस वाटतय…..

पण....
सर्व काही नुसत वाटतच रहातय,
नसून सुद्धा ह्या इथे, तू असल्यासारखी वाटतेस ,
तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,
हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटतय…..

म्हणून तर बघा - I LOVE YOU

म्हणून तर बघा - I LOVE YOU ...

म्हणून तर बघा - I LOVE YOU ...
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU "

समजुन सगळे नासमज बनतात मुली

समजुन सगळे
नासमज बनतात मुली,
चांगल्या चांगल्या मुलांना
वेडयात
काढतात या मुली.
अनोळखी पुरूषाला
दादा - भैय्या म्हणतात मुली,
पण
आपल्याच वडिलांना
काका का म्हणतात या मुली?
बोलायला गेलो तर
लाइन
मारतोय म्हणतात मुली,
मग नाहीच बोललो की
शाइन मारतोय का म्हणतात या
मुली?
मुद्याचं बोलणं थोडंच असतं
तरी चिव चिव चिव चिव खुप करतात
मुली,
जेव्हा खरंच बोलण्याची गरज असते….
तेव्हा नजर खली करुन रुमाल
का खराब करतात या मुली ?
पाऊसात भिजायचं तर असतं
तरी चिखल पाहुन
नाक मुरडतात मुली,
थंडी गुलाबीच चांगली असते म्हणतात
मग २-४ स्वेटर
घालुन सुद्दा कुडकुडतात का या मुली?
वचुन ही कविता
चांगल्याच
भडकतील या मुली
मग (कदाचित) विचार करुन मनात
थोडं तरी बरोबर आहे
म्हणतील या मुली…

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान

अहो ऐकलं का ? 

आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते

बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते

अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाही

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो

मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भ र खातो

अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही 

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

 

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो

काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो

अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

 

आम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,

दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,

अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

 

मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,

कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,

सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

 

लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,

आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,

अणी ठ. रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

 

सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,

बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,

बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही, 

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

 

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,

टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,

अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,

कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

 

 

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,

तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,

सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,

अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,

कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...!

मैत्रीची साद


Wednesday, August 3, 2011

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती खाली इन्द्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमण्डपी कुणि भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडे
वरती खाली जलदांवरती…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आठवेन मी तुला

आठवेन मी तुला..
सोडून तुझ्या काळजाला जाईल, तेव्हा मी आठवेन तुला
काळजाला छातीत शोधशील तेव्हा आठवेन मी तुला..

येईन लपत छपत रोज रातीच्या स्वप्नात तुझ्या,
तेव्हा झोपेत स्मित हसताना आठवेन मी तुला..

माझ्या अल्लड प्रेमाला एकदाच विसरून तु,
दुसर्‍या कोणाला करशील प्रेमात घायाळ , तेव्हा आठवेन मी तुला..

दोस्तांच्या गर्दित गप्पा मारता मारता रुसशील तू,
तेव्हा तुझ्या रुसव्यातूनच आठवेन मी तुला...

माझ्या तस्विरीला डोळ्यातून मिटवण्यासाठी करशील प्रयत्न,
तेव्हा सलत्या पापण्यातून ओघळताना आठवेन मी तुला...

निरव शांततेच्या रातीला , खिडीकीतून पाहशील जेव्हा,
तेव्हा तुझ्यावर ह्सणार्‍या चंद्राला पाहून आठवेन मी तुला..

पुन्हा पुन्हा पावसात ओली चिंब होशील तू,
तेव्हा एकांताच्या सरी अंगावर झेलताना आठवेन मी तुला..

आता प्रत्येक सुखाचा आंनद अनुभवताना,
दुरवर मला शोधून थकशील तू अन आठवेन मी तुला..

निलपरीच्या त्या पोषाखात सज़ून , मोकळ्या केसात
तुझे हात फिरताना आठवेन मी तुला..

तुझ्याच नावाने लिहिल्या सार्‍या गझल,
आता वाचताना होशील भावूक तेव्हा शब्दांतून आठवेन मी तुला

येणार्‍या सर्व आव्हांनासाठी सज्ज


मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...त्यासाठीच ते  पकडून ठेवायचे असते......नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही...... मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........ अस नात फक्त त्रास देत......पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका......... कारण ते हृदयात बसलेले असते "  

 

                       " एकवार आपण कर्ज मानल, की ते देण माणसाच कर्तव्य आहे..... नाहीतर आपल्याला ते मनात मिंदय करत...... मनात दास्य निर्माण करत ......शून्यातने मिळालेला शेवटचा रुपया ही जुगारात लावायला आवडेल...... कारण मी शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो...... मग त्या रुपयातून का नाही पण हें सगळे चांगल्यासाठी .... तसं देवाने मला चांगलच "बनवल" आहे  मी देव मानतो... पण मी प्रयत्नवादी आहे. "

                 

                       "ज्याला आपली मत मांडता येत नाही त्याला मत असून नसून सारखीच!!! आपली मत मांडण्यापेक्षा दुसर्याला पटणारे विचार बोलायचे.... मग विषय संपतो ...विश्वासघात फक्त विश्वासू व्यक्तीच करू शकते..... स्वत:च्या अस्तित्वावर बेतल की, या जगात कोणी कोणाच नसत ....एक माणूस म्हणून तुम्हाला सगळे गुन्हे माफ़.... पण माणूस असाल तर..."

 

                      " वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?.... संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव... संसाराला नाही...... श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते...... "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो, माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!" ....पण फसवणाऱ्या  व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही....... सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम .....हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"

 

                     " मला गाने  म्हणायला ~~~ आवडत..... पण मी गाने  म्हटलेल लोकांना आवडत नाही.... मला प्राणी आवडतात पण त्याना कैद करण आवडत नाही.....प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल जाव.... कारण पकडून पकडून मैत्री करायाला आवडत नाही..... पण मैत्री केल्यावर पकडून ठेवायला आवडत "

                       " जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे  ...  "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!" आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेत. आयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!! नशीबावर विश्वास नाही.....आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "

 

                      " मी कधीच कोणती गोष्ट अर्धवट सोडत नाही..... चांगल किंवा वाईट झाल तरी त्याच खर कारण शोधून काढतो..... मी माझा कोणताच निर्णय नियतिवर सोडत नाही........ मला आयुष्यात जगताना धेय्य, तत्वांशी तडजोड मान्यच नाही...... कारण पर्याय ठेवून जगणारा मी नव्हे."

 

                      "येणार्‍या सर्व आव्हांनासाठी सज्ज

Myaaaaaaaav

20110603-Cat1-1.jpg


लग्नाच्या गाठी

जन्मोजन्मीचं वैर काढत

तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस

लग्नानंतर राहत नाही

एकदा लग्न लावून दिलं की

देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा

तिला भलताच चक्रम वाटायला लागतो

...आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा

प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे

असं प्रत्येक बाईला वाटत असतं

त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख

तिच्या मनात दाटत असतं

तो कधी कसा वागेल

ह्याची जरासुद्धा खात्री नसते

नको तेच नेमकं बोलून जाईल

जे बोलायचं त्याला कात्री असते.

मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं

ती त्याला बोलत बसते

त्याच्या तेही डोक्यावरून जातं

पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते

त्याचा तो गबळा अवतार

तिला नीट्नेटकं राहयचं असतं

तिला चार दिवस सासूचे

त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ

पळत कसला, रांगत असतो

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो

ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल

असं प्रत्यक्षात घडत नाही

त्याच्या स्वप्नाचे पंख लावून

ती त्याच्या आकाशात उडत नाही

तो गच्चीत तिला घेऊन जातो

इंद्रधनुष्यावर चालायला

ती सोबत पापड कुरडया घेते

गच्चीत वाळत घालायला

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची

लखलखती शुक्राची चांदणी असते

हिच्या डोक्यात गोडा मसाला

आणि वर्षभराची भाजणी असते

प्रेमात रंगून, नशेत झिंगून

खूपसं जवळ, काहीसं लांबून

थोडीशी घाई, थोडसं थांबून

पौर्णिमेचा चंद्र त्याला

तिच्या केसात माळायचा असतो

...आणि त्याच वेळेस तिला मोरी धुवायची

किंवा संडास घासायचा असतो.

आपली बायको म्हैस आहे

असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो

Tuesday, August 2, 2011

माझं आणि माझ्या आनंदामधलं 'ते एका पावलाचं' अंतर.....

 माझं आणि माझ्या आनंदामधलं 'ते एका पावलाचं' अंतर.....
  
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.
'साहेब, जरा काम होतं.'
'पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?'
'नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.'
'अरे व्वा ! या आत या.'
आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून.
मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.
'किती मार्क मिळाले मुलाला ?'
'बासट टक्के.'
'अरे वा !' त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.
हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खुष दिसत होता.
'साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !'
'अच्छा, म्हणून पेढे वगैरे !'
शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, 'साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले - यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते - शांत वातावरन ! - आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.'
मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, 'साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको - सगल्य्यांना वाट !
हे नुसते पेढे नाय साहेब - हा माझा आनंद आहे !'
मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.
आतून मोठ्यांदा विचारलं, 'शिवराम, मुलाचं नाव काय?'
'विशाल.' बाहेरून आवाज आला.
मी पाकिटावर लिहिलं -
प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन !
नेहमी आनंदात रहा - तुझ्या बाबांसारखा !

'शिवराम हे घ्या.'
'साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.'
'हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातुन.'
शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.
'चहा वगैरे घेणार का ?'
'नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून...'
'घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !' मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खुप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.
हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !
'माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !' - आनंद 'लांबणीवर' टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे - भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
परमेश्वराने एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठी 'कोणावर' तरी, 'कशावर' तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.
खरं तर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून...आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !
इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोजिशन', आणखी टक्के.. ! या 'आणखी'च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !
जावेद अख्तर साहेबांनी खूप छान लिहून ठेवलंय

सबका ख़ुशीसे फासला एक कदम है
हर घर में बस एक ही कमरा कम है !

शिवराम भेटला नसता तर माझं आणि माझ्या आनंदामधलं 'ते एका पावलाचं' अंतर कदाचित भरून निघालं नसतं.

माझे २०११ साठीचे संकल्प... कारणांसहित...


Juna mail ahe pan hasayala kaay jaate?


माझे २०१० साठीचे संकल्प... कारणांसहित...
माझे २०१० साठीचे संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.
संकल्प १. - सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण -
. - पल्लवी जोशी - आपण तिच्या घरी आरतीला बसल्यासारखं ती टाळ्या वाजवायला लावते. एकदा गीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग संगीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग गायक .... मग वादक.... मग प्रेक्षक..... मग श्रोते...... मग मान्यवर..... मग ती स्वत:..... असं नुसत्या टाळ्याच टाळ्या.... ! बर नुसत्या टाळ्या नाही तर जोरदार टाळ्या. वाट्टेल ते मॅचिंग करुन, वाट्टेल त्या गाण्याला, वाट्टेल त्या शब्दांनी, तिला ओ का ठो कळत नसताना, मळमळेल इतकं कौतुक करते. अगदी कुणी ढेकर जरी दिला तरी, "काय अप्रतिम ढेकर दिलास आणि माझ्या खुप आवडीच्या ढेकरांपैकी एक ढेकर दिलास म्हणुन तुझे विशेष आभार.... " काय बोलयचं ह्यावर.... ?
. - अवधुत गुप्ते तिचा मोठा भाऊ - "अरे... अरे... अरे... काय भन्नाट, सुसाट, अचाट गायलास... मित्रा..... कानाचे पडदे पार फाडलेस बघ... अरे काय साजुक खाऊन नाजुक गळ्यातुन चाबुक ढेकर दिलास गड्या.... एक नम्बर.. माझ्या एकातरी गाण्यात हि हार्मनी वापरणार बघ मी.....
. बाळासाहेब मंगेशकर - (खयाल गायकी, शोभा गुर्टु, तंबो-याचा तारा, स्वातंत्र्यपुर्व काळ, ज्ञानेश्वर महाराज, आकाशवाणी अशा विविध विषयांवर बोलल्यानंतर सुमारे पावणे दोन तासांनी...) "...१९६३ मध्ये लताच्या रेकॉरडींगच्या वेळेस गाणं गाताना तिला असाच विलंबीत ढेकर आला होता. त्यावेळेस मी तिच्याकडुन वरचा ढ लावुन घेतला आणि..... ..............................

.............................
.............................. .............................. ...................... .
.............................. ................ .....................
.......................... ...........................असो .... !
संकल्प २. - बायकोशी कधीही भांडणार नाही.
कारण - ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास.....
. - ती तिच्या चुका मान्य करत नाही.
. - जीभेला हाड नसतं, हे ती सिद्ध करते.
. - परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, " माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला आणि एकदा जरा आरशात........
.............................अ सो.... !
संकल्प ३. - खोटं बोलणार नाही.
(हे जरा अशक्य कोटीतलं होतय का ? बर मग ... खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण -
. - हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
. - ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसते. ती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते. सुट्टीचा आनंद मिळत नाही.
. - नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःख विसरायला आलोय हे कारण त्याला पटत नाही. त्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
. - खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप....
.............................अ सो.... !
संकल्प ४. - दारु पिणार नाही.
कारण -
. - तोल जातो.
. - पैसे जातात
. - चव जाते.
. - शुद्ध जाते.
. - दृष्टी जाते.
. - मजा जाते.
. - इज्जत जाते.
संकल्प   . - कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण -
. - तिच्याकडुन डाव्या गालावर...
. - संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर....
संकल्प ७. - पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही. (बसमध्ये बसणार नाही, असे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मला कधीच बसायला मिळाले नाहीये.)
कारण -
. - उरलेले सुट्टे पैसे, चपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही.
. - हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाही. जिथं उतरावं लागतं तिथं खाली कुणाची तरी दुचाकी असतेच. तो जिथं सोडेल तिथुन परत (बस करुनच) यावं लागतं.
. - पुढुन चढुन देत नाहीत, सर्कस करायचा अनुभव नसल्यास मागुन चढता येत नाही. ड्रायव्हर तोंडात गुटका असल्याने बोलत नाही, कंडक्टर ऐकत नाही.
. - तिकीट चुकवुन.... म्हणजे चुकुन राहिल्यास चेकर बापाचा उद्धार....
.............................अ सो.... !
संकल्प ९. - घड्याळ न बघता, पिशवी न घेता, सुट्टॆ पैसे न घेता, वाईट मूड नसेल तर, अपमान पचवण्याची तयारी नसेल तर आणि दुसरा पर्याय असेल तर पुण्यातल्या पितळेबंधु मिठाईवाले ह्या दुकानात पाऊल टाकणार नाही.
कारण -
. - गर्दीत ताटकळत उभं राहुन चक्कर येते पण आपला नंबर येत नाही.
. - १ वाजला की काहिही झालं तरी दुकान बंद होते. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणे. आगीचा बंब पोहचता पोहचता १ वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता ४ वाजता या.... १ वाजता बंद म्हणजे बंद !! )
. - पिशवी विसरली तर ते देत नाहीत. अंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतात. पिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचा आहे, पिशव्या विकण्याचा नाही, असा आपमान करतात.
. - सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.
संकल्प १०. - योगासनं आणि व्यायाम करणार नाही.
कारण -
. - योगासनं करताना काही चूक झाली तर ते सोडवताना खुप त्रास होतो. काल डाव्या पायाचं तिसरं बोट मी उजव्या हाताच्या करंगळीत पकडल्यानंतर पाठीचा मणका माकडहाडात अड्कुनच बसला हो.... बायकोनी पेकाटात लाथ घातली तेंव्हा...... असो...
. - व्यायाम केला की खुप थकायला होतं.... गळुन जायला होतं.... चक्कर येते..... आजारी पडायला होतं. तब्येत बिघडते.
. - इतकं करुन कुणी एक झापड जरी मारली तरी.....
.............................अ सो.... !
संकल्प ११. - हिमेश रेशमीयाच्या आवाजातलं गाणं आणि सुनील शेट्टीचा अभिनय ह्यांच्या वाटेला जाणार नाही.
कारण -
. - डीप्रेशन येतं....
. - बीपी वाढतं....
. - डोकं फोडावसं वाटतं (स्वतःचं)
. - जीव घ्यावासा वाटतो (त्यांचा)
. - कपडे फाडावेसे वाटतात (पुन्हा स्वतःचेच)
. - भयानक स्वप्न पडतात. भास होतात...
. - पुन्हा कधीतरी ते दिसेल, ऐकु येईल असं वाटत राहतं...
संकल्प १२. - वाहतुकीचे नियम मोडणार नाही.
कारण -
. - मागच्या आठवड्यात मी मोटार-सायकल रेस मधे पहिला आलो. मग त्याच चौकात मला बक्षिस म्हणुन १०० रुपयांची पावती देण्यात आली. आता मी ठरवलय सगळे पुढे गेले तरी चालतील पण सिग्नल तोडायचा नाही.
. - झेब्रा क्रॉसिंगवर उभं राहिलो तर, "वेळ जात नाही म्हणुन आम्ही हे पट्टे मारलेले नाहियेत" अशी बहुमुल्य माहिती एका मामानी मला १०० रुपयात दिली.
. - घाई गडबडीत जोरात जात असताना रस्त्यावर मध्येच उभ्या असलेल्या मामाला....
.............................अ सो.... !

घरी असताना कधी घरच्यांचं महत्व कळलंच नाही


घरी असताना कधी घरच्यांचं महत्व कळलंच नाही
आज मात्र क्षणोक्षणी त्यांचीच आठवण येते........
अन डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही

नेहमीच असा वाटायचं कि घरापासून लांब जावं
थोडसं आयुष्य को होईना स्वतः च्या पद्धतीने जगावं

आजही तो दिवस स्मरणात आहे
जेव्हा पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर आलो
आपलं म्हणणारे मित्र भेटले हे नक्कीच
पण आप्तांसाठीच मी परका झालो

नवीन कॉलेज,नवीन मित्र ....,सारकाही नवीन होतं
या मायानगरीत मी हरवणार तर नाहीना असाच नेहमी भासत होतं

दररोज आईबाबांचा फोन यायचा
अन पहिला प्रश्न हाच असायचा " तिकडे सर्व ठीक आहे ना ?"
मीही फक्त "होय" म्हणायचो अन डोळ्यात आलेले अश्रू चटकन सावरून घ्यायचो
पण माहित नाही आईला कसं काय कळायचं
ती मला लगेच विचारून घ्यायची "तुला काही त्रास तर नाहीना"
मी म्हणायचो छे छे "त्रास"........ नाही माझा जरा घसा बसलाय

मी खोटं बोलतोय हे आईलाही कळायचं फोनवर बोलताना हृदय तिचही गहिवरून यायचं
चटकन मग "बाबा" आईकडून फोन घ्यायचे
अन मला धीर देवून......."इकडे सारकाही अगदी व्यवस्थित आहे
तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे आणि स्वतः ची काळजी घे "असं सांगायचे

आज मी घरी अधूनमधून जातो पण पाहुणा म्हणून
अन लगेच परत निघून येतो कॉलेज असतं माझं म्हणून
खरच आता नकोसा झालाय हा एकटेपणा अन हे शिक्षण
नेहमीच घरच्यांची आठवण येते नकोसा वाटतो क्षणक्षण

घराबाहेर टाकलेलं हे पाउल म्हणजे यशसंपन्नतेच शिखर
गाठण्यासाठी केलेली वाटचाल कि शिक्षा हेच मला कळत नाही

खरचं.............
घरी असताना घरच्यांचं महत्व कधी कळलंच नाही......